Friday, 20 February 2015

१६५९ नोव्हेंबर मध्ये स्वराज्यावर अफझलखान चालून आणि आणि छत्रपतींनी त्याला प्रतापगड पायथ्यालाच आडवा केला.

अफझल वधाची बातमी विजापूरला पोचण्याच्या आत शिवरायांनी वेगाने चाल करीत कोल्हापूर प्रांत काबीज केला. सोबत पन्हाळा आणि विशाळगड काबीज केले.

उपराजधानी पन्हाळा गेल्याने आदिलशहाच्या जखमेवर मीठ चोळले गेले.

अफझल वधाची आणि पन्हाळा मराठ्यांच्या ताब्यात गेल्याची बातमी एकाच वेळी विजापूर दरबारात गेली. वरून आभाळ कोसळले आणि त्याच वेळी पायाखालून जमीन सरकली अशी गत आदिलशहाची झाली.

त्याने अफझलपुत्र फाझलखानला सैन्य देऊन पन्हाळा व कोल्हापूर पुन्हा मिळवण्यासाठी पाठवले, पण शिवरायांनी त्याचा दारूण पराभव केला

No comments:

Post a Comment