शिवरायांची प्रतिभा ही अतिशय उत्तुंग होती हयात कणभरही संशय नाही. शिवरायांच्या अंगभूत गुणांची बरोबरी तर सोडाच त्याचे एक दशमांश सुद्धा आज कोणात सापडणार नाही हे अगदी सत्य आहे.
किंतु, "शिवरायांना ' कुळवाडीभूषण रयतेचा राजा ' हे विशेषण महात्मा जोतिबा फुले यांनी दिले" ह्याचा जर आधार दिला असता तर फार बरे झाले असते. कारण माझ्या वाचनात आलेल्या फुलेंच्या 'सार्वजनिक सत्यधर्मपुस्तक' हयात तर फुलेंनी शिवरायांना अक्षरशून्य असे उद्बोधुन त्यांनी समर्थ रामदासांच्या कपटजालात फसून शुद्र-अतिशुद्रांच्या ईश्वराने पाठवलेल्या मसीहा मुसलमानांचा पाठलाग केला; असे लिहिलेले मिळाले. मग फुलेंनी शिवरायांना 'कुळवाडीभूषण रयतेचा राजा' हे विशेषण लावले असे म्हणणे हे खुद्द फुलेंना दुतोंडी ठरवते. जे मला तरी उचित वाटत नाही. असो....
"ज्योतिबा फुले ह्यांच्यामुळे जगाला शिवराय माहीत झाले" हां दावा तर अतिशय चुकीचा व जणू शिवरायांच्या प्रतिभेलाच धक्का लावण्याचा अपराध आहे. कारण शिवराय जेव्हा हयात होते तेव्हाच; अर्थात फुले जन्माला येण्याच्या २०० वर्षे आधीच अफझल्याला यमसदनी धाड़ले तेव्हाच शिवरायांची किर्ती जगभर पसरली होती.. अक्षरशः इंग्लंडच्या वृत्तपत्रात त्यांची बातमी छापून आली होती. आणि ५ मोठ्या पातशाह्यांना धुळ चारुन महाबलाढ्य असे हिंदु साम्राज्य निर्माण करून तत्कालीन बहुतांश राजशक्तींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःचा राज्याभिषेक करवणार्या व महाराष्ट्रातीलच नव्हे; तर अखिल हिंदुस्थानातील जनमानसावर विलक्षण छाप सोड्णार्या शिवरायांची जगाला ओळख करून दिली हे म्हणणे म्हणजे एखाद्या अफ्रीकन जंगलात राहणार्या कृष्णवर्णी मनुष्याने सुर्याला तेलाचा दिवा दाखवण्यासारखे आहे.
तसेच ज्या फुलेंनी शिवरायांची ओळख जगाला करून दिली असा दावा केला जातोय त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात शिवचरित्राचे किती पारायण केलेत, त्यावर किती व्याख्यान दिलीत? कारण त्यांनी शिवचरीत्राला जनमानसात पोहोचवण्यासाठी खुप काही कयास घेतले हे सिद्ध करणारा एकही समकालीन पुरावा नाही.
मुळात बहुतांश गोष्टी ह्या तथ्यहीन व केवळ कोरे आरोप आहेत ज्यांचा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. जसे की; "छञपती शिवरायांनासुध्दा धर्माच्या नावाखाली शुद्र ठरविले होते. राज्याभिषेक नाकारला होता" ह्याला एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.
"महात्मा फुलेंना एक इंग्रजी अधिकारी लिजिट साहेब यांनी इंग्रजीमध्ये असलेला छञपती शिवरायांचा इतिहास थोडाफार सांगितला होता. त्यांना शिवरायांबद्दल उत्सुकता निर्माण झाली".... मुळात; ज्या इंग्रजांना शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या सरहद्दीत एक इंचही घुसू दिले नाही... ज्यांना कधी उभेही केले नाही... त्या इंग्रजाकडून शिवचरीत्र समजले; ते ही महाराष्ट्रातच जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाला.... हे म्हणजे महताश्चर्यच म्हणावे लागेल... ह्याचा अर्थ असा निघतो की हां माणूस एकतर कधीही महाराष्ट्राच्या मातीशी जुडला नसावा; किंवा त्याला शिवरायांविषयी फार काही आपुलकीच नसल्याने त्याने त्यांच्या चरित्राविषयी कधी अभ्यास केला नसावा, अन्यथा त्याला आपल्या स्वजनांवर विश्वास नसावा.
"टिळकांनी फुलेंच्या सामाजिक क्रांतीला धर्मप्रतीक्रांतीत परावर्तित केले आणि बहुजन राजा ब्राम्हणी बंदीगृहामध्ये बंदिस्त केला" हां तर अतिशय हास्यास्पद दावा आहे... कारण स्वतः फुलेंनी आपल्या पोवाडयात समर्थ रामदास स्वामींना शिवरायांचा गुरु संबोधून त्यांनी शिवरायांना उत्तेजित केल्याने ते मुसलमानांच्या पाठीमागे लागले असा दावा केलाय... ह्याचा अर्थ; स्वतः फुले हे मानतात की शिवराय ज्याला वर लेखकाने ब्राम्हणी धर्म संबोधले आहे त्या सनातन हिंदु धर्मासाठी मुसलमानांविरोधात लढले (ज्यांना फुले आपले मसीहा मानतात). पुन्हा; शिवरायांच्या समकालीन सर्व साहीत्यात; मग ते कवी भूषण ह्यांच शिवभूषण असो, की स्वामी परमानंदांच शिवभारत असो, की सभासद बखर असो, प्रत्येकात हे जागोजागी अगदी स्पष्ट जाणवते की शिवराय हे ज्याला वरील लेखक ब्राम्हणी धर्म म्हणून उपालंभ देतोय त्या सनातन हिंदु धर्माचे परम निष्ठावान, कट्टर पुरस्कर्ते व त्याला मानणारे होते.... ह्या संबंधी बरेच आधारभूत प्रसंगही शिवचरीत्रात सापडतात... जाणकारांना जास्त बोलणे न लगे.
आणि जे इंग्रज जगभर स्वतःच्या कपटपूर्ण निती विषयी जगभर प्रसिद्द होते; व ज्यांनी शिवरायांना नेहमी एक शत्रु म्हणूनच पाहीले, त्या इंग्रजाकडून कोणत्या प्रकारचे शिवचरीत्र शिकले असावे हे स्पष्टच आहे.... व अशा माणसाकडून शिवचरीत्र शिकून काय धारणा बनणार हे ही अगदी स्पष्ट आहे.
आता राहीला शेवटचा व सर्वात महत्वाचा मुद्दा.... शिव-समाधी शोधाचा.. तर त्यावर अखेरचे २ शब्द....
शिव-प्रभुंची समाधी जेथे आहे ते रायगड ही शिव-प्रभुंनी स्थापन केलेल्या हिंदु साम्राज्याची राजधानी.. तेव्हा १६७४ मध्ये शिवराज्यभिषेकापासून ते १८१८ मध्ये इंग्रजांकडून झालेल्या मराठेशाहीच्या पतनापर्यंतच्या एकुण १५० वर्षात फार तर मधले एक ते दीड दशक सोडले तर (जेव्हा रायगड जंजीऱ्याच्या सिद्दीकड़े होते व नंतर १७३५ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पहिल्या छत्रपती शाहुंसाठी तो जिंकुन दिला), बहुतांशी रायगड हे शिव-प्रभुंच्या वंशजांकड़े, अर्थातच मराठ्यांकड़ेच होते. त्यामुळे आणि शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्वाविषयी महाराष्ट्रातील असलेला जनमानसातील स्नेह व आदर भाव पाहता पुढील ३०-४० वर्षातच शिव-प्रभुंची समाधी हरवणे किंवा विस्मृतीत जाणे कदापि शक्य नाही.
पुन्हा; १८१८ मध्ये इंग्रजांसमोर मराठ्यांच्या पतनानंतरही जो तह झाला तो सातार्याची गादी व इंग्रज यांच्यात झालाय.
त्यावेळी अजिंक्यतारा, रायगड व परळीचा किल्ला याचा ताबा सातारकरांनी स्वत:कडे ठेवला होता.
अजिंक्यतारा- निवासस्थान
परळीचा किल्ला- गुरूस्थान
रायगड- राजधानी.
ह्याचा अर्थ; १८१८ नंतर ही बऱ्याच काळ रायगड हे सातारा गादीकड़े होते; जे की शिव-प्रभुंचेच वंशज होते ...
त्यामुळे समाधी न तर हरवली होती न विस्मृतीत पडली होती... हां केवळ एक खोटा प्रचार आहे... अप-प्रचार.... तसेही समाधी काही कोणाच्या खिशातील पाकीट किंवा एखाद वस्तु नाही की हरवेल.... व जिचा शोध लावावा लागेल....
मुळात, सदोदितच्या युद्धजन्य स्थितीमुळे व इंग्रजांनी केलेल्या तूफ़ान मार्याने रायगडची पडझड झालेली होती... आणि जे रायगडाने झेलले तेच काही प्रमाणात समाधीने ही... त्यामुळे समाधीची वास्तू थोड़ी जीर्ण झाली होती.... जिचाच जीर्णोद्धार पुढे १९१३ मध्ये टिळकांनी पुढाकार घेऊन करवून घेतला. त्याचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे.
किंतु; काही हिंदु धर्म-द्रोही व ब्राम्हण-द्वेषी उपटसुंभ प्रवृत्तींना एका ब्राम्हणाला मिळत असलेले हे श्रेय पाहवले नाही... व त्यांनी समाधी शोधाची काल्पनिक स्टोरी बनवून तीचा प्रचार केला... मुळात, फुलेंच्या समाधीच्या शोधाचा एकही समकालीन ऐतिहासिक पुरावा उपलब्धच नाही.. जसे की एखादे तेलचित्र, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात बातमी.... किंवा फुलेंच्या एखाद्या सोबतीने आपल्या लिखाणात कुठे नमूद केलेले त्याचे वर्णन वगैरे....
त्यामुळे त्यांच्या समाधी-शोधाचा हां दावा पूर्णपणे फोल असून त्यामागे द्वेषपूर्ण वृत्तीने रचलेले कारस्थान मात्र आहे.... तेव्हा असा हां खोटा इतिहास व अप-प्रचार त्वरीत थांबवावा ही विनंती...
हर हर महादेव जय श्रीराम
जय भवानी जय शिवाजी......!!!!