३८५ वर्षानंतर पुन्हा...
भाग १ ला
शिवबा..कुठं निघालात ! (मांसाहेब जिजाऊ शिवरायांना उद्देशून)
आऊसाहेब खूप दिवसापासून आमचा सह्याद्री आम्हाला त्याच्या भेटीला बोलवत आहे.म्हटलं जरा त्याची भेट घेवून यावी.म्हणून सह्याद्रीच्या भेटीला जात आहे.
शिवबा मागच्या वेळेस तुम्ही गेला होता तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची शपथ घेवून आला होतात.ते हि मला न सांगता..परंतु आता तसलं काही करू नका म्हणजे झालं.
कारण तेव्हा ती गरज होती..आणि आता ती इतिहास जमा झालेली एक सुंदर गोष्ट आहे.
आता शास्त्रासहित कार्यभाग घडू द्या.आपण त्या निसर्गाच्या शास्त्राआड येता कामा नये.
ठीक आहे आऊसाहेब आम्ही या निसर्ग परमेश्वराच्या शास्त्रधरून सुरु असलेल्या कार्यात बाधा येईल असा कोणतचं कार्य करणार नाही.आम्ही फक्त सह्याद्रीचा फेरफटका मारून येतो...
आशीर्वाद असावा... जगदंब !
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
(जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आशीर्वाद देऊन सह्याद्री भेटीची परवानगी दिली.)
अरे..राज्या तुझ्या मायला..ते पोरग कुठं गेल बघ जरा,इथे मिरवणुकीची तयारी झालेली आहे.त्याला लवकर शिवाजी महाराजांचे कपडे घाल आणि तो घोड्यावाला आला कि नाही ते पण बघ..हो बघतो’’बघतो !
आईला गण्या..तुला कोणी दिली रे हि कापड,मायला लई भारी दिसतोस तू,एकदम शिवाजी महाराजांसारखाचं. मी शिवाजीचं आहे ! गण्या बोलू लागला..
राज्या म्हणतो..अरे तू शिवाजी महाराजांचे कापड घातले म्हणून तू त्यांच्यासारखा दिसत आहेस फक्त कळल का.उगाचं शिवाजी महाराजं बनू नको..चल लवकर खाली सर्व तुझी वाट बघत आहेत मिरवणुकीला सुरवात होईल थोड्या वेळात.अरे हा घोड्यावाला का नाही आला अजून..तितक्यात गण्या बोलला माझा अश्व मी सोबत आणला आहे. हो का महाराजं कुठं आहे तुमचा अश्व..आणि गण्याने हृदयावर हाथ ठेवला आणि फक्त जगदंब म्हटलं तितक्यात अश्व समोरून घावत आला.राज्याला काही कळतं नव्हत,शेवटी त्याने लक्ष न देता.गण्याला घेवून गेला आणि त्याला त्या अश्वावर बसवलं.आणि त्या शिवाजी महाराजांचे रूप धारण केलेल्या गण्याला अश्वासोबत शिवरायांच्या स्मारका जवळ आणून उभ केलं.आणि तो दुसऱ्या कामाला लागला..
मित्रांनो..शिवरायांच्या स्मारकाजवळ अश्वावर विराजमान झालेली ती व्यक्ती दुसरी कोणी नसून साक्षात विश्ववंदनीय शिवाजी महाराजंचं होते.त्या ठिकाणी गण्याने शिवरायांचे नाही तर शिवरायांनी त्या बाल गण्याचे रूप धारण केलेले होते.
थोड्या वेळाने शिवाजी महाराजांच्या बाजूला दोन मावळे आले.त्या दोघांनी सर्व प्रथम महाराजांना मुजरा केला आणि बोलले महाराज आपण हे असले बाळरूप धारण कराल असं वाटलं नव्हतं.आणि महाराजांनी एक स्मित हास्य केलं आणि बोलले आज शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. म्हटलं चला आज शिवभक्तांच्या आनंदात आपण पण शामिल होऊ या ..पण तुम्ही असे अचानक इथे कसे आलातं.महाराजं आम्हाला आऊसाहेबांनी तुमच्या सोबतीला पाठवलं आहे.
(कदाचित त्या मावळ्यांनी सुद्धा तेथील मावळ्यांचे रूप धारण केलेलं असावेत)
आणि महाराजांनी हृदयावर हात ठेवून आऊसाहेबांचे स्मरण केलं आणि बोलले
“आऊसाहेब आम्हाला माफ करा आम्ही आपल्या पासून एक गोष्ट लपवली.ती म्हणजे आम्ही इथं सह्याद्रीचा फेरफटका मारायला नाही तर या सह्याद्रीच्या गडवाटची वाट लावणाऱ्या माणसांना योग्य वाटेवर आणण्यासाठी आलो आहोत...जगदंब !
ये चला..प्रमुख पाहुणे आलेत.मिरवणुकीच्या उद्घघाटनप्रसंगी एक प्रमुख व्यक्तीला तिथे बोलावण्यात आलेलं होत.त्याने सर्व प्रथम महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमस्कार केला नंतर महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले आणि आरती ओवाळली व श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरवात झाली.कलियुगातील मिरवणुकीचा ताफा हा तुम्हाला माहिती आहेचं, सुरवातीला डी.जे. नंतर स्वयंघोषित बेधुंदपाने नाचणारे मावळे...नंतर स्वतः साक्षात शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबत असलेले दोन मावळे म्हणजे नेताजी आणि तानाजी.व महाराजांच्या मागे एका वाहनावर ठेवलेली महाराजांची मूर्ती होती.मिरवणुकीचा ताफा वाजत गाजत पुढे सरकत होता.तितक्यात तानाजी महाराजांना म्हणाला राजं हा कसला शिवजन्मोत्सव आपल्या मावळ्यांनी तलवारीच्या खणखनाटावर मोघलांना नाचवलं होत पण आज स्वतःला तुमचे मावळे म्हणवून घेणाऱ्यांना नाचवायला ढोलकीची एक थापचं पुरेशी आहे.बघा कसे नाचता आहे बेधुंद होऊन.
तितक्यात नेताजी बोलला महाराज ते बघा ते काहीतरी पेय पीत आहे आणि लगेच नाचायला घुसत आहेत.काय असेल हो महाराजं ते.महाराज बोलले माहिती नाही.
नंतर नेताजीने त्या मिरवणुकीतील एका व्यक्तीला विचारलं कि अरे भावा ते लोक काय पेय पीत आहेत. तर तो बोलला कि ती दारू आहे दारू.नंतर नेताजी महाराजांना म्हणाला महाराज दारू तर आपण पीत नव्हतो आपण तिला फक्त बारूद उडवायला वापरत होतो.पण हि कोणती दारू आहे अशी जिला हे लोक पीत आहेत.तेव्हा महाराज बोलले कदाचित ते मद्य असावं.
आणि ते मद्य पिऊन हि माकड माझ्या समोर नाचत आहे. खरचं निर्लज्जतेचा कळस केला या सर्वांनी..आणि महाराजांनी डोळे बंद केले आणि एक क्षण हि तिथे न थांबता महाराजांनी थेट प्रतापगड गाठला..त्यांच्या मागोमाग नेताजी आणि तानाजी सुद्धा प्रतापगडावर महाराजांच्या समोर हजर झाले. महाराजांनी व दोघ मावळ्यांनी त्यांची खरी रूप धारण केली.
तानाजी : महाराजं आपण तिथून असे अचानक का निघून आलात..
महाराजं : तान्हा..आम्ही आऊसाहेबांना शब्द दिला आहे कि,आम्ही शास्त्रसोडून कुठलंच कार्य करणार नाही.आणि आम्ही जर अजून काही वेळ त्या माणसांच्या मिरवणुकीत असतो तर कदाचित आमच्या म्यानातून भवानी बाहेर उपसली गेली असती आणि आमच्या हातून कित्येक जणांचा नरसंहार घडला असता.अरे कसला अभिमान आणि स्वाभिमान बाळगत आहे हि माणसं.ज्यांना माणूस म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटते.हिचं काय ती रयत ज्यांच्यासाठी आम्ही आमची जीवाभावाची माणसं गमावली.. काय तर शिवजन्मोउत्सव म्हणे..
अरे शिवजन्मोत्सव तर फक्त नावाला आहे त्या मागे यांची हि असली गैरकृत्य चालतात,आज आम्हाला आऊसाहेबांना दिलेला शब्द अडवत आहे नाहीतर...
तानाजी आणि नेताजी : महाराजं शांत व्हा !
नेताजी : महाराज सर्वच ठिकाणी अश्याप्रकारे शिवजन्मोत्सव साजरा होतो असे नाही.काही ठिकाणी आपल्या पालखीचे सुद्धा आयोजन केले जाते तिथे पारंपारिक वाद्य वाजवली जातात.पोवाडे म्हटले जातात.सांस्कृतिक आणि समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम सुद्धा राबवले जातात.आजही असे कार्यक्रम आयोजित केलेले असतीलं आपली आज्ञा असेल तर आपण तिथे जाऊया..
महाराज : नेता..आम्हाला माहिती आहे.पण तुम्ही सांगितलेली शिवजयंती हि दर वर्षी नित्यनियमित न चुकता साजरी केली जाते.बरोबर ना..
नेताजी : व्हयं महाराजं !
महाराजं : मग तरी सुद्धा यांच्यात बदल का नाही.वर्षातून एकदाचं यांना माझे गुणगान गावसं वाटतं, दर वर्षी माझा वेश धारण करून मिरवणुकीत एक दिवसाचा का होईना पण कोणीही शिवाजी महाराज बनतो.पण पुढचं वर्ष येईपर्यंत त्याने आम्हाला आवडेल असं एकही कर्म केलेलं नसतं.मग यांच्या पेक्षा शिवा काशीद श्रेष्ठचं म्हणावा लागेल.जो एक दिवसाचा शिवाजी महाराज बनला पण आमच्या हृदयावर त्याचं नाव कोरून गेला.पण यांना आमच्या हृदयावर नाव कोरता येण्याइतक कार्य करता तर येत नाहीचं नाही. पण यांना साध माझं हृद्य म्हणून या सह्याद्रीच्या कुशीत उभी असलेली गडकिल्ले सुद्धा शाबूत ठेवता येत नाही.त्यांचं संवर्धन करता येत नाही.माझ्या जयंतीला हा असला नाच गाण्यात पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा माझ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च केला तर तिचं खरी शिवजयंती असेल आणि तोच खरा मला केलेला मानाचा मुजरा असेलं.
तानाजी : महाराज क्षमा असावी.. पण तो काळ वेगळा होता.
महाराजं : का ! पुन्हा शिवा
काशीदसारखे,बाजीप्रभू यांच्यासारखे,तुमच्यासारखे जीवाचं रान करून मातृभूमीचं रक्षण करणारे मावळे जन्माला घालायचं सामर्थ्य या मातृभूमीत राहिलेलं नाही का ? तान्हा..
तानाजी : नाही महाराजं मला तस म्हणायचं नव्हतं.
नेताजी : महाराज आताचा हा काळ खूप बदललेला आहे.तुम्ही फक्त हा शिवजन्मोत्सव अनुभवून बघितला.तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला आताचे संपूर्ण दैनंदिन जीवनाचे दर्शन घडवतो.
महाराजं : नेताजी आम्ही या ठिकाणी आलो ते याचं कारणासाठी,आम्हाला या दुबळ्या रयतेचे प्रश्न सोडवायचे आहे आणि राजकीय सत्तेचा आणि पैशांचा माज चढलेल्या यवनांच्या हातून पुन्हा एकदा माझा सह्याद्री मला स्वतंत्र करायचा आहे.
नेताजी : आज्ञा महाराजं ! तुम्ही सांगाल तसचं होईलं.
महाराजं : तान्हाजी आणि नेताजी आपण देव,देश,धर्म आणि माणूस या चारही जणांना आमच्या समोर हजर करा. त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची चूक काय हे आपण त्यांच्या कडूनच जाणून घेवू. आणि आपली भेट आता थेट रायगडावरचं होईलं.
या तुम्ही आता.
(महाराजांना मुजरा करून, महाराजांची आज्ञाप्रमाण म्हणून तानाजी व नेताजी हे देव देश आणि धर्म तसेच माणूस यांचा शोध घ्यायला गेले.)
(- “मित्रांनो शब्दात न धरता त्या मागची भावना जाणून घ्या..”) लवकरच पुढील भाग...
- शिवाजी राजे यांच्या समोर ते चारही (देव देश आणि धर्म तसेच माणूस ) आले तर त्यांच्याशी महाराजांचा काय संवाद होईल...ते पुढील भागात !
----- क्रमश :-----
जय भवानी जय शिवाजी
साभार - सागर महाडिक (शाब्दिक वादळ)
जगदंब
--------------------------------
भाग १ ला
शिवबा..कुठं निघालात ! (मांसाहेब जिजाऊ शिवरायांना उद्देशून)
आऊसाहेब खूप दिवसापासून आमचा सह्याद्री आम्हाला त्याच्या भेटीला बोलवत आहे.म्हटलं जरा त्याची भेट घेवून यावी.म्हणून सह्याद्रीच्या भेटीला जात आहे.
शिवबा मागच्या वेळेस तुम्ही गेला होता तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची शपथ घेवून आला होतात.ते हि मला न सांगता..परंतु आता तसलं काही करू नका म्हणजे झालं.
कारण तेव्हा ती गरज होती..आणि आता ती इतिहास जमा झालेली एक सुंदर गोष्ट आहे.
आता शास्त्रासहित कार्यभाग घडू द्या.आपण त्या निसर्गाच्या शास्त्राआड येता कामा नये.
ठीक आहे आऊसाहेब आम्ही या निसर्ग परमेश्वराच्या शास्त्रधरून सुरु असलेल्या कार्यात बाधा येईल असा कोणतचं कार्य करणार नाही.आम्ही फक्त सह्याद्रीचा फेरफटका मारून येतो...
आशीर्वाद असावा... जगदंब !
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
(जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आशीर्वाद देऊन सह्याद्री भेटीची परवानगी दिली.)
अरे..राज्या तुझ्या मायला..ते पोरग कुठं गेल बघ जरा,इथे मिरवणुकीची तयारी झालेली आहे.त्याला लवकर शिवाजी महाराजांचे कपडे घाल आणि तो घोड्यावाला आला कि नाही ते पण बघ..हो बघतो’’बघतो !
आईला गण्या..तुला कोणी दिली रे हि कापड,मायला लई भारी दिसतोस तू,एकदम शिवाजी महाराजांसारखाचं. मी शिवाजीचं आहे ! गण्या बोलू लागला..
राज्या म्हणतो..अरे तू शिवाजी महाराजांचे कापड घातले म्हणून तू त्यांच्यासारखा दिसत आहेस फक्त कळल का.उगाचं शिवाजी महाराजं बनू नको..चल लवकर खाली सर्व तुझी वाट बघत आहेत मिरवणुकीला सुरवात होईल थोड्या वेळात.अरे हा घोड्यावाला का नाही आला अजून..तितक्यात गण्या बोलला माझा अश्व मी सोबत आणला आहे. हो का महाराजं कुठं आहे तुमचा अश्व..आणि गण्याने हृदयावर हाथ ठेवला आणि फक्त जगदंब म्हटलं तितक्यात अश्व समोरून घावत आला.राज्याला काही कळतं नव्हत,शेवटी त्याने लक्ष न देता.गण्याला घेवून गेला आणि त्याला त्या अश्वावर बसवलं.आणि त्या शिवाजी महाराजांचे रूप धारण केलेल्या गण्याला अश्वासोबत शिवरायांच्या स्मारका जवळ आणून उभ केलं.आणि तो दुसऱ्या कामाला लागला..
मित्रांनो..शिवरायांच्या स्मारकाजवळ अश्वावर विराजमान झालेली ती व्यक्ती दुसरी कोणी नसून साक्षात विश्ववंदनीय शिवाजी महाराजंचं होते.त्या ठिकाणी गण्याने शिवरायांचे नाही तर शिवरायांनी त्या बाल गण्याचे रूप धारण केलेले होते.
थोड्या वेळाने शिवाजी महाराजांच्या बाजूला दोन मावळे आले.त्या दोघांनी सर्व प्रथम महाराजांना मुजरा केला आणि बोलले महाराज आपण हे असले बाळरूप धारण कराल असं वाटलं नव्हतं.आणि महाराजांनी एक स्मित हास्य केलं आणि बोलले आज शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. म्हटलं चला आज शिवभक्तांच्या आनंदात आपण पण शामिल होऊ या ..पण तुम्ही असे अचानक इथे कसे आलातं.महाराजं आम्हाला आऊसाहेबांनी तुमच्या सोबतीला पाठवलं आहे.
(कदाचित त्या मावळ्यांनी सुद्धा तेथील मावळ्यांचे रूप धारण केलेलं असावेत)
आणि महाराजांनी हृदयावर हात ठेवून आऊसाहेबांचे स्मरण केलं आणि बोलले
“आऊसाहेब आम्हाला माफ करा आम्ही आपल्या पासून एक गोष्ट लपवली.ती म्हणजे आम्ही इथं सह्याद्रीचा फेरफटका मारायला नाही तर या सह्याद्रीच्या गडवाटची वाट लावणाऱ्या माणसांना योग्य वाटेवर आणण्यासाठी आलो आहोत...जगदंब !
ये चला..प्रमुख पाहुणे आलेत.मिरवणुकीच्या उद्घघाटनप्रसंगी एक प्रमुख व्यक्तीला तिथे बोलावण्यात आलेलं होत.त्याने सर्व प्रथम महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमस्कार केला नंतर महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले आणि आरती ओवाळली व श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरवात झाली.कलियुगातील मिरवणुकीचा ताफा हा तुम्हाला माहिती आहेचं, सुरवातीला डी.जे. नंतर स्वयंघोषित बेधुंदपाने नाचणारे मावळे...नंतर स्वतः साक्षात शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबत असलेले दोन मावळे म्हणजे नेताजी आणि तानाजी.व महाराजांच्या मागे एका वाहनावर ठेवलेली महाराजांची मूर्ती होती.मिरवणुकीचा ताफा वाजत गाजत पुढे सरकत होता.तितक्यात तानाजी महाराजांना म्हणाला राजं हा कसला शिवजन्मोत्सव आपल्या मावळ्यांनी तलवारीच्या खणखनाटावर मोघलांना नाचवलं होत पण आज स्वतःला तुमचे मावळे म्हणवून घेणाऱ्यांना नाचवायला ढोलकीची एक थापचं पुरेशी आहे.बघा कसे नाचता आहे बेधुंद होऊन.
तितक्यात नेताजी बोलला महाराज ते बघा ते काहीतरी पेय पीत आहे आणि लगेच नाचायला घुसत आहेत.काय असेल हो महाराजं ते.महाराज बोलले माहिती नाही.
नंतर नेताजीने त्या मिरवणुकीतील एका व्यक्तीला विचारलं कि अरे भावा ते लोक काय पेय पीत आहेत. तर तो बोलला कि ती दारू आहे दारू.नंतर नेताजी महाराजांना म्हणाला महाराज दारू तर आपण पीत नव्हतो आपण तिला फक्त बारूद उडवायला वापरत होतो.पण हि कोणती दारू आहे अशी जिला हे लोक पीत आहेत.तेव्हा महाराज बोलले कदाचित ते मद्य असावं.
आणि ते मद्य पिऊन हि माकड माझ्या समोर नाचत आहे. खरचं निर्लज्जतेचा कळस केला या सर्वांनी..आणि महाराजांनी डोळे बंद केले आणि एक क्षण हि तिथे न थांबता महाराजांनी थेट प्रतापगड गाठला..त्यांच्या मागोमाग नेताजी आणि तानाजी सुद्धा प्रतापगडावर महाराजांच्या समोर हजर झाले. महाराजांनी व दोघ मावळ्यांनी त्यांची खरी रूप धारण केली.
तानाजी : महाराजं आपण तिथून असे अचानक का निघून आलात..
महाराजं : तान्हा..आम्ही आऊसाहेबांना शब्द दिला आहे कि,आम्ही शास्त्रसोडून कुठलंच कार्य करणार नाही.आणि आम्ही जर अजून काही वेळ त्या माणसांच्या मिरवणुकीत असतो तर कदाचित आमच्या म्यानातून भवानी बाहेर उपसली गेली असती आणि आमच्या हातून कित्येक जणांचा नरसंहार घडला असता.अरे कसला अभिमान आणि स्वाभिमान बाळगत आहे हि माणसं.ज्यांना माणूस म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटते.हिचं काय ती रयत ज्यांच्यासाठी आम्ही आमची जीवाभावाची माणसं गमावली.. काय तर शिवजन्मोउत्सव म्हणे..
अरे शिवजन्मोत्सव तर फक्त नावाला आहे त्या मागे यांची हि असली गैरकृत्य चालतात,आज आम्हाला आऊसाहेबांना दिलेला शब्द अडवत आहे नाहीतर...
तानाजी आणि नेताजी : महाराजं शांत व्हा !
नेताजी : महाराज सर्वच ठिकाणी अश्याप्रकारे शिवजन्मोत्सव साजरा होतो असे नाही.काही ठिकाणी आपल्या पालखीचे सुद्धा आयोजन केले जाते तिथे पारंपारिक वाद्य वाजवली जातात.पोवाडे म्हटले जातात.सांस्कृतिक आणि समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम सुद्धा राबवले जातात.आजही असे कार्यक्रम आयोजित केलेले असतीलं आपली आज्ञा असेल तर आपण तिथे जाऊया..
महाराज : नेता..आम्हाला माहिती आहे.पण तुम्ही सांगितलेली शिवजयंती हि दर वर्षी नित्यनियमित न चुकता साजरी केली जाते.बरोबर ना..
नेताजी : व्हयं महाराजं !
महाराजं : मग तरी सुद्धा यांच्यात बदल का नाही.वर्षातून एकदाचं यांना माझे गुणगान गावसं वाटतं, दर वर्षी माझा वेश धारण करून मिरवणुकीत एक दिवसाचा का होईना पण कोणीही शिवाजी महाराज बनतो.पण पुढचं वर्ष येईपर्यंत त्याने आम्हाला आवडेल असं एकही कर्म केलेलं नसतं.मग यांच्या पेक्षा शिवा काशीद श्रेष्ठचं म्हणावा लागेल.जो एक दिवसाचा शिवाजी महाराज बनला पण आमच्या हृदयावर त्याचं नाव कोरून गेला.पण यांना आमच्या हृदयावर नाव कोरता येण्याइतक कार्य करता तर येत नाहीचं नाही. पण यांना साध माझं हृद्य म्हणून या सह्याद्रीच्या कुशीत उभी असलेली गडकिल्ले सुद्धा शाबूत ठेवता येत नाही.त्यांचं संवर्धन करता येत नाही.माझ्या जयंतीला हा असला नाच गाण्यात पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा माझ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च केला तर तिचं खरी शिवजयंती असेल आणि तोच खरा मला केलेला मानाचा मुजरा असेलं.
तानाजी : महाराज क्षमा असावी.. पण तो काळ वेगळा होता.
महाराजं : का ! पुन्हा शिवा
काशीदसारखे,बाजीप्रभू यांच्यासारखे,तुमच्यासारखे जीवाचं रान करून मातृभूमीचं रक्षण करणारे मावळे जन्माला घालायचं सामर्थ्य या मातृभूमीत राहिलेलं नाही का ? तान्हा..
तानाजी : नाही महाराजं मला तस म्हणायचं नव्हतं.
नेताजी : महाराज आताचा हा काळ खूप बदललेला आहे.तुम्ही फक्त हा शिवजन्मोत्सव अनुभवून बघितला.तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला आताचे संपूर्ण दैनंदिन जीवनाचे दर्शन घडवतो.
महाराजं : नेताजी आम्ही या ठिकाणी आलो ते याचं कारणासाठी,आम्हाला या दुबळ्या रयतेचे प्रश्न सोडवायचे आहे आणि राजकीय सत्तेचा आणि पैशांचा माज चढलेल्या यवनांच्या हातून पुन्हा एकदा माझा सह्याद्री मला स्वतंत्र करायचा आहे.
नेताजी : आज्ञा महाराजं ! तुम्ही सांगाल तसचं होईलं.
महाराजं : तान्हाजी आणि नेताजी आपण देव,देश,धर्म आणि माणूस या चारही जणांना आमच्या समोर हजर करा. त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची चूक काय हे आपण त्यांच्या कडूनच जाणून घेवू. आणि आपली भेट आता थेट रायगडावरचं होईलं.
या तुम्ही आता.
(महाराजांना मुजरा करून, महाराजांची आज्ञाप्रमाण म्हणून तानाजी व नेताजी हे देव देश आणि धर्म तसेच माणूस यांचा शोध घ्यायला गेले.)
(- “मित्रांनो शब्दात न धरता त्या मागची भावना जाणून घ्या..”) लवकरच पुढील भाग...
- शिवाजी राजे यांच्या समोर ते चारही (देव देश आणि धर्म तसेच माणूस ) आले तर त्यांच्याशी महाराजांचा काय संवाद होईल...ते पुढील भागात !
----- क्रमश :-----
जय भवानी जय शिवाजी
साभार - सागर महाडिक (शाब्दिक वादळ)
जगदंब
--------------------------------
No comments:
Post a Comment