Friday, 6 March 2015

अस्सल पत्र


या अस्सल पत्राचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा मित्रांनो!

शिवछत्रपती व समर्थ रामदास यांचा काही संबंध नव्हता असा धादांत खोटा अपप्रचार करणा-या राष्ट्रद्रोही शक्तींच्या तोंडावर मारायला असे पुरावे नेहेमी आपल्या संग्रही बाळगत जा!

श्री क्षेत्र चाफळची रामनवमी ची यात्रा व इतरवेळीही याठिकाणास कोणाचाही उपद्रव होऊ नये,म्हणून कोलच्या सुभेदारास जातीने हजर राहून यात्रा सुखरूप पार पाडण्याची सूचना श्री शिवाजी महाराजांनी या पत्रात केली आहे....

श्री क्षेत्र चाफळ रामनवमी यात्रेसंदर्भात सुभेदार गणेश गोजदेउ यांना शिवरायांचे पत्र...

१५९४ श्रावण शुद्ध ९

श्री

मशहुरल हजर राजश्री गणेश गोजदेउ सूबेदार व कारकुन सुबा ता कोल प्रती राजश्री शिवाजीराजे दंडवत शुहुर सन सलास सबैन व अलफ कसबे चाफल तेथे रामदास गोसावी आहेती व श्री रघुनाथ चे देवालये केले..यात्रा भरते सर्वदा मोहछाये चालतो तेथे कट्कीचे सिपाही व बाजे लोक राहताती..ते देवाची मर्यादा चालवीत नाहि..यात्रकरू लोकांची बरेच कलागती करून तसवीस देताती म्हणून कलो आले तरी लोकांस ताकीद करणे..आणी यात्रेमधे हो अगर कोणाचा उपद्रव अगर चोराचिरटीयाचा दगा अगर तुरकाचा उपद्रव काही होउ नेदणे..सालाबाद यात्रा राखताती तैसे ता मा चे कारकून संगीजातीने यात्रा राखेत गोसावी यांचा परामर्श करीत देवाकरीता व गोसावीयांकरीता ब्राम्हण येउनु नवी घरे करून राहताती त्यांचा परामर्श घेत सुखरूप राहे ते यात्रा भरे मोहछाये चाले ते करणें तुम्ही ही ********** जाणे अंतर पडो नेदणे छ ७ रविलाखर मोर्तब सूद....

मर्यादेयं विराजते

(मूळ पत्र खालील लिंकवर उपलब्ध)

लिंक--> http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html

No comments:

Post a Comment