Sunday, 27 December 2015

पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस...

पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.
६ हजार विरुध्द ३०० जण लढलेच कसे असतील?
काय माणसे असतील ती ?
काय ती मंतरलेली रात्र असेल ?
खरंच! शब्दानाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात...
पन्हाळ गडाहून अंधाऱ्या रात्रीत पळत त्या पावनखिंडीत यायचे तेही आडवाटेने.
अंतर सहज ४०-५० कि.मी. असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हातात हत्यारे घेऊन शत्रूशी दोन हात करायचे ३०० विरुध्द ६ हजार....
कसा मेळ बसायचा?
लढाईचे परिणाम काय होणार हे त्या ३०० जणांना माहित असणारच की....
आपण कापले जाणार , मरणार. पण तरीही लढणार ....
कसली माणसे होती ती..
या असल्या नरवीरांच्या मुळे मंडळी आज आपण ''मराठा '' म्हणवून घेत आहोत.
६ तास अखंड झुंज द्यायची...
त्या आधी रात्रभर धावायचे ....
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते विचार करता करता...
" तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता...
" प्रत्यक्ष यमदेव त्या पावन खिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता...
" त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसे या महाराष्ट्राच्यामातीने जन्माला घातली ....
" मंडळी हे स्वराज्य सुखाने नाही मिळाले .. हजारो प्राणांचे बलिदान आहे यामागे.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा ||
* अभिमानाने शेयर करा.....
* आपला इतिहास हाच महाराष्ट्राचा खरा दागिना आहे !!

Thursday, 24 December 2015

मत छेडो हिंदुओ को बहुत मुशकिल होगा......
वरना लिखेगे ऐसा इतिहास की पढणा मुशकिल होगा......
एकच तत्व हिंदुत्व. ....

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही....
.
तो थांबतो,
.
.
वेळ जाऊ देतो,
.
.
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो.....


प्रोढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतस, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना
मानाचा मुजरा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा




Wednesday, 23 December 2015

तुम्हाला कळतंय का.… काहीतरी चुकतंय आपलं.

तुम्हाला कळतंय का.… काहीतरी चुकतंय आपलं.

वाघाच्या समोर पडलेल्या, भीतीने सर्व अवसान गळलेल्या परिस्थितीतही वाघासमोर हात जोडणार्या हतबल माणसाचे शुटींग करू पण स्वताच्या कपड्यांचा दोरखंड करून त्याला बाहेर नाही काढणार.

वर्दीच्या माजाने बेधुंद झालेला एखादा पोलिस एका तरुणाला अकारण शिवीगाळ करतोय - मारतोय तर त्याचा विडीओ काढू पण सर्वांनी एकत्र येउन त्या पोलिसाला समज देण्याचे धाडस नाही करणार.

एखादा घमेंडी मुलगा बेदरकारपणे एखाद्या तरुणीच्या गाडीवर स्वताची गाडी ठोकून मर्दुमकी दाखवताना त्याला एक कानाखाली वाजवून जागेवरच त्याची औकात दाखवण्या ऐवजी एखाद्या वाहनाच्या आडून शुटींग करण्यात धन्यता मानणार.

वेगवान लोकल गाडीतून पडत असताना जीवाच्या आकांताने मदतीची याचना करणार्या आणि आपल्या डोळ्यासमोर मरणार्या तरुणाचे शुटींग करू पण झटकन त्याच्या कंबरेच्या पट्ट्याला घट्ट धरून त्याचे प्राण वाचवण्याचा साधा प्रयत्नही नाही करणार. 

सोशल नेटवर्किंग वरची झटपट प्रसिद्धी आणि फेसबुक च्या लाईक याच्यासाठी काहीही करूअरे हे झालं तेव्हा मी स्वतः तिथे होतो हे मोठ्या फुशारक्या मारत सांगू पण जे सहज टाळता आलं असतं त्याचा विषयपण नाही काढणार.

ही प्रवृत्ती आता बदलूत अन् समाजाच्या कामी येवूयात

सेन्सेशनल पोस्ट पुढे पाठवताना इमोशनल अप्रोच मागेच राहत चाललाय याच्याकडे लक्ष नाही आपलं.. 

खरचचुकतंय आपलंकाहीतरी चुकतंय आपलं.
म्हणून नक्कीच यापुढे समाजपयोगी कामे करुया.


Monday, 21 December 2015

छत्रपती शिवाजी महाराज युद्ध मोहिमे वरती जाताना आपल्या आई जिजाऊ न सोबत व महाराण्यान सोबत चर्चा करत
ज्या काळा मध्ये स्त्रियांना कुठले हि स्वातंत्र्य नसताना महाराजांनी त्यांना प्रतेक क्षेत्रात प्रधान्य दिले
महाराज मोहिमे वरती असतांना जिजाऊ स्वराज्याचा कारभार सांभाळत
आपल्या सुनांना प्रशाशनाचे हक्क अधिकार दिले
स्त्री स्वातंत्र्याची सुरवात त्यांनी आपल्या घरातून सुरु केली.


" शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण ! आनंदाने नांदत होते बहुजन-मुसलमान !! म्हणजेच शिवराज्यामध्ये मुस्लिमांना किती आदराने वागवलं जायच हे यावरुन स्पष्ट होते. मात्र काही जात्यांध संघटना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करुन त्यांची प्रतिमा मुस्लिमविरोधी असल्याचे सांगतात. त्याच संघटना जातीय दंगली घडविण्यात यशस्वी होतात. सर्वसामान्य मूलनिवासी बहुजन समाज़ातील आणि मुस्लिमांची मुले या दंगलीत धर्माच्या नावाखाली वापरल्या जातात व सत्यशोधक शिवबांच्या नावावर मुस्लिमांचा तिरस्कार करणारे समाज कंटक स्वत: सुरक्षित राहतात......... जय जिजाऊ....... जय शिवराय

Saturday, 19 December 2015

श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा...

स्वराज्य होउन सुशासन व्ह्यायला अवघ आयुष्य काय तर सात जन्म सुद्धा वाट पहावी लागली असती. आणि त्यासाठी लागणारा विवेक हा राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यापाशी होता...
हिन्दवी स्वराज्याचा होम धगधगत ठेवण्यासाठी लाखो मराठी स्वराज्याचे शिलेदार आपल्या उभ्या आयुष्याच्या आणि संसाराच्या आहुत्या देत होते..
अथक परीश्रम करून स्वराज्याचा ची पाळमुळ रचून त्या अभेद्य वटवृक्षाची सावली आपल्या पुढच्या पिढीला मिळावी अशी दूरदृष्टी श्रीशिवप्रभुंची होती..
भविष्यात कश्मीर पासून कन्याकुमारी परीयंत हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होईल आणि होणारच आणि ह्या मराठी साम्राज्याचा राजा ही जबरदस्त असला पाहिजे. ह्याचा विचार शिवप्रभुनी केला असणारच.
त्याच्या समोर हिंदवी स्वराज्याचा भावी छत्रपतींची मुर्ति उभी.
हुशार, कर्तबगार, शुर लढ़वय्या शिपाई गडी, संस्कृत पड़ींत जनू असे
एका सम्राटाचे वलय त्यांना लाभले होते. महाराणी जिजाऊसाहेब ह्यांच्या पंखाखाली वाढलेले. दिल्ली पासून दक्षिणे परियन्त च्या राजकारणात न्हाहुन निघालेले. शिवरायांन एवढेच पुरंदर, वीर धुरंधर, धर्मवीर छत्रपती ते...
जैसे शिवप्रभुंनी जानिले तैसेचि शंभूराज्यांनी स्वराज्य सांभाळले...
ह्या वीरनृपाचा जन्म आज किल्ले पुरंदर वर झाला...
श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा..

Monday, 14 December 2015

।। एक आवाज एकच पर्याय ।। ।।जय जिजाऊ जय शिवराय।।

उभाच राहीन नेहमी,
गाथा तुमच्या पराक्रमाची,
आठवन सदा करुन देईन,
मराठ्यांच्या इतिहासाची.....
कहाणी भगव्या रक्ताची..
हादरलेल्या तख्ताची..
जिजाऊंच्या दुधाची..
गुलामगीरीच्या क्रोधाची..
जन्म देणा-या मातेची..
पराक्रमाच्या प्रथेची..
शिवरायांच्या धैर्याची..
शंभुच्या शौर्याची..
तळपत्या भवाणीची..
उफानत्या ईंद्रायणीची..
मावळ्यांच्या शक्तीची..
तंत्रशुध्द युक्तीची..
सह्यांद्रीच्या माथ्याची..
रायगड्याच्या पायथ्याची..
फौलादी छातिची..
तलवारीच्या पातीची..
रणागंनाच्या मातीची..
मराठ्यांच्या जातीची..
रयतेच्या भक्तीची..
भगव्याच्या शक्तीची..
स्वराज्य प्राप्तीची..
स्वातंत्र्याच्या तृप्तिची..
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।


१ च खंत आहे, मराठी माणूस शांत आहे - नितीन बानुगडे पाटील

नितीन बानुगडे पाटील
🇦🇺अमेरीकावाले बोलतात की बुलेट पृफ जॅकेटचा शोध आम्ही ६० वर्षांपूर्वी लावला
आता ह्यांना कोण सांगणार की बुलेट पृफ जॅकेटचा शोध ३५० वर्षापूर्वी "छ्त्रपती संभाजी महाराजांनी" लावलाय.
आता आजून १,
जर आपल्या बापजादयांना विचारल संभाजी महाराज माहीत आहे का ?
तर ते बोलतात संभाजी महाराज नाय माहीत पण संभाजी बिडी माहीती आहे,अरे ज्या राजाला सुपारीच्या खांडाच व्यसन नाय त्या राजाच नाव बिडीला दिलय, अरे नाव दयायचय तर त्या अणूवस्त्रला दया ना संभाजी मिसाईल,संभाजी अणूबॉम्ब बिडी ला काय नाव देता
आता शेक्टच सांगतो,
आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री "विनोद तावडे" म्हणतात की मी आपल्या महाराष्ट्राचा ईतिहास प्रत्येक विद्याथ्या पर्यंत पोचवीन काल ईयत्ता १ ते १० च्या ईतीहासाच्या पुस्तकाची पान चाळली "संभाजी महाराजांचा" ईतिहास ४ च्या पुस्तकामध्ये त्यांचा थोडाफार उल्लेख केला आहे व ईयत्ता ७ च्या पुस्तकामध्ये "छत्रपती संभाजी महाराज" हा फक्त चार पानाचा धडा आहे बस बाकी ईयत्ता १० पर्यंत संभाजी राजांच नावही नाही, अरे ज्या राजाने १४० लढाया केल्या ऐकही लढाई हरला नाही त्या राजाच्या ४ लढाया जरी दाखवल्या असत्या ना तरी तुमच ईतीहासाच्या पुस्तकाची पान भरुन गेली असती
जर स्वतःला मराठा🐅 म्हणत असाल ना तर शेअर करा कळू दया या महाराष्ट्राच्या भ्रष्ट सरकारला की "शंभू राजा" आजूनही मराठी माणसाच्या काळजात जिवंत आहे.
१ च खंत आहे,
मराठी माणूस शांत आहे .
जय शंभूराजे 🚩🐅🚩

★ शिवाजी महाराज व बाल संभाजी राजे दिसायला कशे होते?? ★
२९-मे-१६६६ रोजी परकलदास कल्यानदासाला पत्रात लिहितो. अस्सल पत्र राजस्थानी घुंगराली भाषेत आहे. _(Shivaji's Visit to Auragnzib ata Agara_Rajasthani Records)
"पहाणाराला शिवाजी किरकोळ व बुटका असल्यासारखा वाटतो (अस्सल पत्रात_ "अर सेवोजी (शिवाजी) डील तो हकीर छोटो सो ही देखता दिस जी."). त्याचा चेहरा रंगाने फ़ारच सुंदर असून तो कोण आहे याची चवकशी नकरितां तो लोकांचा राजा असला पाहिजे असें दिसून येते (पत्रात_ "अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग उपुछो राजवी दीसौ जी।"). त्याचें धैर्य व धाडस स्पष्ट दिसून येते. तो फ़ार मोठा पराक्रमी व उग्र प्रक्रुति असून त्याला दाढी आहे
(पत्रात_"हिम्मती मरदानगी ने देखतां ही असौ दिसोजु बहुत मरदानो हिम्मतवुलंद आदमी छो। सेवाजी (शिवाजी) के डाढी छै।). त्याचा मुलगा नौउ वर्षांचा आहे व तो दिसण्यास अप्रतिम देखणा व रंगाने गोरा आहे (पत्रात_"और सेवाजी (शिवाजी) को बेटो वरस ९ को छै, सु भी वहत अजाइब सुरती छै जी गोरो रंगी।")."
राजे आग्र्याला गेले होते तेंव्हा परकलदासाने त्यांना समक्ष पाहिले होते.
🚩🔥॥ हर हर महादेव, जय श्रीराम ॥🚩
🚩॥ जय भवानी, जय शिवाजी.॥🚩







🔥

Saturday, 21 March 2015

गुढीपाडव्याच्या आणि हिंदूनववर्षाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या आणि हिंदूनववर्षाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व !
महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष २१ मार्चपासून, हिंदू वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.
गुढी उभारण्याची पद्धत:
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !